
Wednesday, September 14, 2011
Monday, September 12, 2011
'तेजुकाया'वर आघात
मिरवणुकीतील अपघाताने गणेशभक्तांवर दु:खाचा डोंगर
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात मिरवणूक निघाली... 'ही शान कुणाची, तेजुकायाच्या राजाची' घोषणा आसमंतात दुमदुमली... मिरवणूक चिंचपोकळी ब्रिजजवळ आली आणि तो अपघात घडला... नियतीची काय इच्छा होती माहीत नाही, पण आमच्यावर आलेले विघ्न बाप्पाने कदाचित आपल्या अंगावर झेलेले आणि आम्हाला सुखरूप ठेवले... अत्यंत जड अंत:करणाने 'तेजुकाया मॅन्शन'चे कार्यकर्ते सांगत होते.
विसर्जनाची मिरवणूक जल्लोषात पुढे सरकत असतानाच ट्रॉलीवरून गणरायाची मूतीर् खाली कोसळली. या अपघातानंतर 'तेजुकाया मॅन्शन'च्या घराघरांतील उदास चेहरे रविवारी त्यांच्यावर कोणता जीवघेणा प्रसंग आला, हे स्पष्ट सांगत होते. गेली ४६ वर्षे तेजुकायामध्ये गणेशोत्सव साजरा होतो आहे. २००२ पासून मंडळाची मूतीर् लक्षवेधी ठरत आहे. शिस्तबद्धपणासाठी ख्याती असलेल्या या मंडळाने उत्सवाचे पावित्र्य निष्ठेने जपले आहे. यंदाची अनंत चतुदशीर् मात्र कधीही भरून येणाऱ्या जखमेसारखी आयुष्यभर टोचत राहील, असे सांगताना कार्यर्कत्यांचा बांध फुटला आणि डोळे पाणावले. गिरणगावाच्या पुनविर्कासात नव्याने उभारी घेत असलेल्या 'तेजुकाया मॅन्शन'ची चाळ पाडून पुढील वषीर् उत्सव टॉवरमध्ये साजरा होणार आहे. झालेला आघात कल्पनेपलीकडचा आहे. काय झाले ते शब्दांत सांगता येणार नाही. आमच्यावर आभाळच कोसळले. भक्तांवर आलेले विघ्न बाप्पाने कदाचित आपल्यावर झेलले आणि आम्हाला सुखरूप ठेवले, असे मंडळाचे अध्यक्ष अरूण गावकर यांनी सांगितले. या बिकट प्रसंगात लालबागचा राजा, गणेशगल्ली मंडळाच्या कार्यर्कत्यांनी 'तेजुकाया'ला धीर देत सोबत केली.
उंचीचा वाद नको
अपघातामुळे अनेक जण मूतीर्च्या उंचीचा वाद नाहक उकरून काढत आहेत. आमची मूतीर् ही फक्त १५ फुटांची होती. गणरायांच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीत सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. समुदात विसर्जन करतानाही मूतीर्च्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. ही घटना हा निव्वळ अपघात असून त्यावर अधिक चर्चा करून उत्सवाचे पावित्र्य बिघडवू नये, असे आवाहन गावकर यांनी केले.
विसर्जनाची मिरवणूक जल्लोषात पुढे सरकत असतानाच ट्रॉलीवरून गणरायाची मूतीर् खाली कोसळली. या अपघातानंतर 'तेजुकाया मॅन्शन'च्या घराघरांतील उदास चेहरे रविवारी त्यांच्यावर कोणता जीवघेणा प्रसंग आला, हे स्पष्ट सांगत होते. गेली ४६ वर्षे तेजुकायामध्ये गणेशोत्सव साजरा होतो आहे. २००२ पासून मंडळाची मूतीर् लक्षवेधी ठरत आहे. शिस्तबद्धपणासाठी ख्याती असलेल्या या मंडळाने उत्सवाचे पावित्र्य निष्ठेने जपले आहे. यंदाची अनंत चतुदशीर् मात्र कधीही भरून येणाऱ्या जखमेसारखी आयुष्यभर टोचत राहील, असे सांगताना कार्यर्कत्यांचा बांध फुटला आणि डोळे पाणावले. गिरणगावाच्या पुनविर्कासात नव्याने उभारी घेत असलेल्या 'तेजुकाया मॅन्शन'ची चाळ पाडून पुढील वषीर् उत्सव टॉवरमध्ये साजरा होणार आहे. झालेला आघात कल्पनेपलीकडचा आहे. काय झाले ते शब्दांत सांगता येणार नाही. आमच्यावर आभाळच कोसळले. भक्तांवर आलेले विघ्न बाप्पाने कदाचित आपल्यावर झेलले आणि आम्हाला सुखरूप ठेवले, असे मंडळाचे अध्यक्ष अरूण गावकर यांनी सांगितले. या बिकट प्रसंगात लालबागचा राजा, गणेशगल्ली मंडळाच्या कार्यर्कत्यांनी 'तेजुकाया'ला धीर देत सोबत केली.
उंचीचा वाद नको
अपघातामुळे अनेक जण मूतीर्च्या उंचीचा वाद नाहक उकरून काढत आहेत. आमची मूतीर् ही फक्त १५ फुटांची होती. गणरायांच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीत सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. समुदात विसर्जन करतानाही मूतीर्च्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. ही घटना हा निव्वळ अपघात असून त्यावर अधिक चर्चा करून उत्सवाचे पावित्र्य बिघडवू नये, असे आवाहन गावकर यांनी केले.
सौजन्य:मटा ऑनलाइन
मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन अपघात, १ ठार
मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीला दोन अपघातांमुळे गालबोट लागले आहे. लालबागचा राजा भारतमाता थिएटरजवळून जात असताना एका जुन्या इमारतीची गॅलरी पडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला आणि पाचजण जखमी झाले. त्या पाठोपाठ चिंचपोकळी येथे तेजूकाया गणपती मंडळाची गणेश मूर्ती कोसळून दोनजण जखमी झाले.
सकाळी लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली. मिरवणूक भारतमाता जवळ येताच राजावर पुष्पवृष्टी केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी रस्त्यावर तसेच आसपासच्या इमारतीच्या खिडक्या आणि गॅल-यांमध्ये प्रचंड गर्दी केली. तब्बल ६०-७० वर्षे जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर, दुकानाच्या पत्र्याच्या छपरावर आणि पहिल्या मजल्याच्या गॅलरीत प्रमाणापेक्षा जास्त नागरिक दाटीवाटीने उभे होते. अतिरिक्त भार आल्यामुळे अखेर गॅलरीचा काही भाग आणि त्याला लागून असलेला दुकानाच्या छताचा पत्रा कोसळला. गॅलरीतले लोक खाली पडले. या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. एक लहान मुलगा, महिला आणि तीन पुरुष जखमी झाले. अनेकांना किरकोळ जखमा झाल्या.
पोलिसांनी जखमी झालेल्यांना केइएममध्ये दाखल केले आणि किरकोळ जखमींना घटनास्थळीच तातडीने वैद्यकीय मदत दिली.
अपघाताच्या धक्क्यातून सावरण्याआधीच भारतमाता पासून काही मिनिटांच्या अंतरावर चिंचपोकळीतील गणेश टॉकीज येथे तेजूकाया गणपती मंडळाची गणेश मूर्ती कोसळली. हा प्रकार कसा झाला ते अद्याप समजलेले नाही. मात्र मूर्ती अंगावर पडल्याने दोनजण जखमी झाल्याचे समजते.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना विसर्जन मिरवणुकीत नियमांचे पालन करण्याचे आणि स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सकाळी लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली. मिरवणूक भारतमाता जवळ येताच राजावर पुष्पवृष्टी केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी रस्त्यावर तसेच आसपासच्या इमारतीच्या खिडक्या आणि गॅल-यांमध्ये प्रचंड गर्दी केली. तब्बल ६०-७० वर्षे जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर, दुकानाच्या पत्र्याच्या छपरावर आणि पहिल्या मजल्याच्या गॅलरीत प्रमाणापेक्षा जास्त नागरिक दाटीवाटीने उभे होते. अतिरिक्त भार आल्यामुळे अखेर गॅलरीचा काही भाग आणि त्याला लागून असलेला दुकानाच्या छताचा पत्रा कोसळला. गॅलरीतले लोक खाली पडले. या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. एक लहान मुलगा, महिला आणि तीन पुरुष जखमी झाले. अनेकांना किरकोळ जखमा झाल्या.
पोलिसांनी जखमी झालेल्यांना केइएममध्ये दाखल केले आणि किरकोळ जखमींना घटनास्थळीच तातडीने वैद्यकीय मदत दिली.
अपघाताच्या धक्क्यातून सावरण्याआधीच भारतमाता पासून काही मिनिटांच्या अंतरावर चिंचपोकळीतील गणेश टॉकीज येथे तेजूकाया गणपती मंडळाची गणेश मूर्ती कोसळली. हा प्रकार कसा झाला ते अद्याप समजलेले नाही. मात्र मूर्ती अंगावर पडल्याने दोनजण जखमी झाल्याचे समजते.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना विसर्जन मिरवणुकीत नियमांचे पालन करण्याचे आणि स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य:मटा ऑनलाइन
Tuesday, September 6, 2011
Friday, September 2, 2011
भाऊंचा 'अजिंक्य' गणेश
ब्रिटीशकालीन मुंबई शहराच्या आधुनिकीकरणाच्या वाटचालीत ' भाऊचा धक्का ' हा माइलस्टोन आहे . देशपरदेशातून मालवाहतूक करणाऱ्या बोटींसाठी आणि कोकणातील प्रवाशांसाठी समुद्र हटवून बंदर बांधण्याची किमया लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य ऊर्फ भाऊ रसूल यांनी केली . भाऊच्या धक्क्याइतकीच ऐतिहासिक परंपरा त्यांच्या घरच्या गणेशोत्सवालाही आहे . भाऊंच्या घरातील गणपतीचे यंदा १६७ वर्ष आहे .
भाऊंनी आपला मुलगा रामचंद्र याला मूल होणार या आनंदात १८४५ मध्ये घरी गणपती आणण्याची परंपरा सुरू केली . २०० वर्षांपूर्वी १८४५ ते १८९५ दरम्यान गिरगावात , १८९६ ते १९३५ परळ आणि १९३६ पासून आतापर्यंत प्रताप मॅन्शन , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मार्ग , दादर टी . टी . येथील घरात सहा पिढ्यांनी गणपती आणण्याची परंपरा जपली आहे . गणपतीचा चौरंग , समया , पूजेची भांडी हे साहित्य वंशपरंपरागत चालत आलेले आहे . पूजेतील पंचामृताची भांडी औरंगजेबाचे मुलगे आज्जमशाह आणि कामबक्ष यांच्या काळातील चलनी नाण्यांना चांदीचे जोडकाम देऊन बनवण्यात आली आहेत . गणपतीमागचा आरसाही १०० वर्षांपूर्वीचा आहे . विश्वास नारायण अजिंक्य हे भाऊंचे सहावे वंशज गणेशोत्सवाची ही वैभवशाली परंपरा जपत आहेत .
हजार नाण्यांचा संग्रह
अजिंक्य यांच्या घरच्या संग्रहात धनाच्या पेटीतून वंशपरंपरेने आलेली शिवकालीन , होळकर , बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड , ब्रिटीशकालीन अशी एक हजार नाणी आहेत . १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी कपाटे , बिजागरावर ' मेड इन विन व्हिक्टोरियन लंडन ' लिहिलेले शिसवी लाकडाचे जुने पेटारे , पोर्तुगीज खेळणी अशा अनेक पुरातन वस्तू अजिंक्य कुटुंबीयांच्या संग्रही आहेत . स्वत : भाऊ , मुलगा रामचंद्र व नातू विनायक अशा तीन पिढ्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना प्रत्यक्ष भेटल्या असून स्वामींनी १८७० मध्ये स्वहस्ते दिलेल्या चर्मपादुका अजिंक्य यांच्या घरात आहेत .
भाऊ रसूल नावाचा इतिहास
तत्कालीन धाकट्या कुलाब्यात १८२३ मध्ये सुरू झालेल्या ' गन गॅरिएज फॅक्टरी ' मध्ये लक्ष्मण अजिंक्य नोकरीस होते . कॅप्टन रसेल हे तेथील त्यांचे वरिष्ठ होते . कारखान्यातील एका मजुराला क्षुल्लक कारणावरून काठीने झोडपून काढण्याची शिक्षा वरिष्ठांनी दिली होती . त्यात लक्ष्मण यांनी हस्तक्षेप करून ती रद्द केली . त्यामुळे कामगार आदराने त्यांना भाऊ म्हणू लागले . रसेल यांच्याशी असलेल्या स्नेहाच्या संबंधामुळे पुढे ते भाऊ रसूल या नावाने ओळखले जाऊ लागले .
भाऊंनी आपला मुलगा रामचंद्र याला मूल होणार या आनंदात १८४५ मध्ये घरी गणपती आणण्याची परंपरा सुरू केली . २०० वर्षांपूर्वी १८४५ ते १८९५ दरम्यान गिरगावात , १८९६ ते १९३५ परळ आणि १९३६ पासून आतापर्यंत प्रताप मॅन्शन , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मार्ग , दादर टी . टी . येथील घरात सहा पिढ्यांनी गणपती आणण्याची परंपरा जपली आहे . गणपतीचा चौरंग , समया , पूजेची भांडी हे साहित्य वंशपरंपरागत चालत आलेले आहे . पूजेतील पंचामृताची भांडी औरंगजेबाचे मुलगे आज्जमशाह आणि कामबक्ष यांच्या काळातील चलनी नाण्यांना चांदीचे जोडकाम देऊन बनवण्यात आली आहेत . गणपतीमागचा आरसाही १०० वर्षांपूर्वीचा आहे . विश्वास नारायण अजिंक्य हे भाऊंचे सहावे वंशज गणेशोत्सवाची ही वैभवशाली परंपरा जपत आहेत .
हजार नाण्यांचा संग्रह
अजिंक्य यांच्या घरच्या संग्रहात धनाच्या पेटीतून वंशपरंपरेने आलेली शिवकालीन , होळकर , बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड , ब्रिटीशकालीन अशी एक हजार नाणी आहेत . १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी कपाटे , बिजागरावर ' मेड इन विन व्हिक्टोरियन लंडन ' लिहिलेले शिसवी लाकडाचे जुने पेटारे , पोर्तुगीज खेळणी अशा अनेक पुरातन वस्तू अजिंक्य कुटुंबीयांच्या संग्रही आहेत . स्वत : भाऊ , मुलगा रामचंद्र व नातू विनायक अशा तीन पिढ्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना प्रत्यक्ष भेटल्या असून स्वामींनी १८७० मध्ये स्वहस्ते दिलेल्या चर्मपादुका अजिंक्य यांच्या घरात आहेत .
भाऊ रसूल नावाचा इतिहास
तत्कालीन धाकट्या कुलाब्यात १८२३ मध्ये सुरू झालेल्या ' गन गॅरिएज फॅक्टरी ' मध्ये लक्ष्मण अजिंक्य नोकरीस होते . कॅप्टन रसेल हे तेथील त्यांचे वरिष्ठ होते . कारखान्यातील एका मजुराला क्षुल्लक कारणावरून काठीने झोडपून काढण्याची शिक्षा वरिष्ठांनी दिली होती . त्यात लक्ष्मण यांनी हस्तक्षेप करून ती रद्द केली . त्यामुळे कामगार आदराने त्यांना भाऊ म्हणू लागले . रसेल यांच्याशी असलेल्या स्नेहाच्या संबंधामुळे पुढे ते भाऊ रसूल या नावाने ओळखले जाऊ लागले .
Tuesday, August 30, 2011
Some Funny & Nice emails & Links :
Some Funny & Nice emails & Links :
http://blogoscoped.com/files/stripes.html (Running Chitta)
Subscribe to:
Posts (Atom)



