Sunday, January 29, 2012

आज जागतिक सूर्यनमस्कार दिन...........


सूर्यनमस्कार हा भारतीय परंपरेतला एक परिपूर्ण व्यायाम आहे. शास्त्रशुध्द पध्दतीने केला तर यात व्यायामाची बहुतेक सर्व अंगे आपोआप साधतात. स्नायूंचा व्यायाम, श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम, हृदयक्रिया वाढणे, ताण-लवचीकता, पोटातील अवयवांचा व्यायाम इ. बहुतेक सर्व गरजा यात पूर्ण होतात. कमीत कमी बारा सूर्यनमस्कार घालावेत, व सोबत मन प्रसन्न-एकाग्र करण्याचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार घालण्याची पध्दत पुढे दिली आहे.

(1) सुरवातीला सावधान मुद्रेत सरळ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या समांतर रेषेत ठेवून डोक्याच्या दिशेने सरळ करावे. दोन्ही हाताचे पंजे जोडावे व त्याच अवस्थेत त्यांना खाली आणावे. म्हणजे आपण देवाला नमस्कार करतो त्या अवस्थेत उभे राहावे.

(2) जोरात श्वास घेऊन दोन्ही हात कानाला चिकटून राहतील अशा स्थितीत आणून मान व दोन्ही हात मागील बाजूने वाकवावे. असे करत असताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, कानही ताठ राहिले पाहिजेत.

(3) तिसर्‍या अवस्थेत श्वास हळू हळू सोडून पुढच्या बाजूने वाकावे. कानाला चिकटलेल्या अवस्थेत हात जमिनीला ठेकवावे. गुडघे सरळ ठेवावेत. काही क्षण अशा अवस्थेत थांबावे. या अवस्थेला 'पाद पश्चिमोत्तनासन' म्हटले जाते.

(4) त्यानंतर श्वास हळू हळू घेऊन डाव्या पायाच्या मागच्या बाजूला न्यावे. छातीला पुढच्या बाजूला जेवढे ताणता येईल तेवढे ताणावे. मान मागच्या बाजूला न्यावी. पाय ताणलेल्या अवस्थेत व शरीराच्या पुढच्या बाजूला ताणलेले अशा स्थितीत काही क्षण राहावे.

(5) श्वास हळू हळू सोडून उजवा पाय देखील डाव्या पायाप्रमाणे मागच्या बाजूला न्यावा. यावेळी दोन्ही पायाचे पंजे एकमेकाशी जोडलेले पाहिजेत. शरीर पायाच्या बाजूने ओढावे व पायाच्या टाचा जमिनीला टेकण्याचा प्रयत्न करावा. कमरेला जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करावा.

(6) श्वास घेत शरीराला जमिनीच्या समांतर ठेवून साष्टांग दंडवत घालावे व सुरवातीला गुडघे, छाती व डोके जमिनीला टेकवावे. यावेळी कंबर वरच्या बाजूला उचललेली पाहिजे. श्वास सामान्य गतीने सुरू ठेवावा.

(7) दोन्ही हातांवर जोर देऊन छातीला पुढच्या बाजूने ओढावे. मान सरळ ठेवून मागच्या बाजूने न्यावी. गुडघ्याचा जमिनीला स्पर्श करून पायाचे पंजे उभे ठेवावे. या अवस्थेला 'भुजंगासन' म्हटले जाते.

(8) ही अवस्था - पाचव्या अवस्थेसारखी आहे.

(9) ही अवस्था - चौथ्या अवस्थेसारखी आहे.

(10) ही अवस्था - तिसर्‍या अवस्थेसारखी आहे.

(11) ही अवस्था - दुसर्‍या अवस्थेसारखी आहे.

(12) ही अवस्था - पहिल्या अवस्थेसारखी राहील.

वरील बारा पायर्‍या केल्यानंतर थोडा विश्राम करण्यासाठी ताठ सरळ उभे राहावे. त्यानंतर पुन्हा हे आसन करावे. पहिली, दुसरी व तिसऱ्या अवस्थांचा क्रम आधी केल्याप्रमाणेच राहील. मात्र, चौथी अवस्थेत जेथे डावा पाय मागे केला होता तेथे आता उजवा पाय मागे करत सूर्यनमस्कार करावा.

इशारा : ज्या व्यक्तींना कंबर व पाठीच्या मणक्याचे आजार आहे त्यांनी हे आसन करून नये. त्यांनी सूर्यनमस्कार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

फायदा : सूर्यनमस्कार सर्वांसाठीच लाभदायी आहे. सूर्यनमस्कार नियमित केल्याने हातपायाचे दुखणे दूर होऊन त्यांच्यात बळकटपणा येतो. मान, छाती व हाताची दंड भरतात. शरीरावरील बिनकामाची चरबी कमी होते.

सूर्यनमस्कार केल्याने त्वचेचे आजारही कायमचे दूर होतात. नियमित केल्याने पोटाच्या समस्या नाहीशा होऊन पचन क्रिया वाढते. अतिनिद्रा, अल्सर आदी आजारही नाहीसे होतात.

Friday, January 13, 2012

चाणक्य नीती : या 5 गोष्टी कुणालाही सांगू नका

चाणक्य नीती : या 5 गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण आहे --------------

जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपणच भविष्यात अडचणीत येतो. अशा गोष्टींविषयी आचार्य चाणक्य म्हणतात-

अरथ नाश मन ताप अरु, दा चरि घर माहिं।

वंचनता अपमान निज, सुधी प्रकाशत नाहिं।।

आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य, नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे.

आचार्य चाणक्य सांगतात की, शहाणा मनुष्य सदैव आपल्या कमतरता आणि गुप्त गोष्टी गुप्तच ठेवत असतो. जे लोक अशा गोष्टी इतरांना सांगतात, ते भविष्यात कधी ना कधी अडचणीत येतात. आपण कधीही आपल्या आर्थिक स्थितीविषयी खरी माहिती इतरांना सांगू नये. आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे दु:ख होते, मनातील दु:ख किंवा संतापही गुप्त ठेवले पाहिजे. जवळपास प्रत्येक विवाहित माणसाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतातच. त्यामुळे नवरा-बायकोतील या गोष्टी चुकूनही इतरांना सांगू नये.

कधी-कधी नीच व्यक्ती किंवा संस्कारहीन व्यक्तीशी वाद-विवाद होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्या लोकांच्या शब्दांत काहीही गांभीर्य नसते. त्यामुळे त्या लोकांच्या तोंडून आलेली माहितीही कोणासमोर सांगू नये. चाणक्य म्हणतात की, तुम्हालाही अपमान सोसावे लागले असेल तरीही त्याविषयी इतरांसमोर काहीही बोलू नका.

या सा-या गोष्टी इतरांसमोर सांगितल्याने लाभ तर काहीच नाही, पण भविष्यात आपण संकटांत येऊ शकू. त्यामुळे या गोष्टी गुप्तच ठेवणे चांगले.