Monday, December 16, 2019


















शुभंकरोती कल्याणम


शुभंकरोती कल्याणम
आरोग्यम धनसंपदाम
शत्रुबुद्धी विनाशाय
दिपज्योती नमोस्तुते

दिव्या दिव्या दिपत्कार
कानी कुंडल मोतीहार
दिव्याला पाहून नमस्कार
दिवा लावला देवापाशी
उजेड पडला तुळशीपाशी
माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी

तिळाचं तेल कापसाची वात
दिवा जळूदे सारी रात
घरातली पीडा बाहेर जावो
बाहेरची लक्ष्मी घरात येवो
घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो देवो.
















|| श्री गणपती स्तोत्र ||

साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका
भक्तीने स्मरता नित्य आयुकामार्थ साधती

प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते,
तिसरे कृष्णपिंगाक्ष, चवथे गजवक्र ते,

पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नाव ते,
सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धुम्रवर्ण ते,

नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक,
अकरावे गणपती, बारावे श्री गजानन,

देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर,
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तु सर्व सिध्दीत,

विद्यार्थाला मिळे विद्या , धन्यार्थाला मिळे धन,
पुत्रार्थाला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती,

जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ,
एक वर्ष पुर्ण होता मिळे सिध्दी न संशय,

नारदांनी रचिलेले झाले संपुर्ण स्तोत्र हे,
श्रीधराने मराठित पठण्या अनुवादिले.

*****जय श्री गणेशाय नमो नमः*****

गायत्री मंत्र

ॐ भूर्भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यम्
भर्गो देवस्य धीमहि।
धियो यो नः प्रचोदयात्॥

Monday, July 2, 2012

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:
गुरुर्देवो महेश्वरः l
गुरु: साक्षात् परब्रम्ह
तस्मै श्रीगुरुवे नमः ||

आपण सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

आमच्या राजांना,
मातेच्या ममतेबरोबरच प्रसंगी गुरूच्या कठोरपणाने घडवणाऱ्या जिजाऊच्या चरणाजवळ आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी विनम्र अभिवादन...

जय जिजाऊ !
जय शिवराय !!
जय शंभू राजे !!

Friday, June 22, 2012


ढासळले बुरुज तटाला खिंडारे पडली
ना राहिल्या तोफा ना शिबंदीउरली...
हल्ले होत नाहीत आता ना नगारा दुमदुमतो
पडझडलेल्या भिंतींमधून वारा फक्त वाहतो...
फत्तराच्या काळजातला एक एक चिरा निखळून
पडतोय
राजे तुमच्या आठवणींनी उर भरून येतोय...
सह्याद्रीच्या खांद्यांवर मी आजही उभा आहे
तुमच्या कणखर इराद्यांची जाणीव मला आहे
उभाच राहीन मी सांगेन
गाथा तुमच्या पराक्रमाची
आठवण सदा करून देईन
मराठ्यांच्या इतिहासाची||


मुजरा राजं मुजरा

Tuesday, May 29, 2012

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा

Tuesday, May 8, 2012

भातुकलीच्या खेळामधली.....



भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥

राजा वदला , "मला समजली शब्दांवाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा ''
कां राणीच्या डोळा तेव्हा, दाटुनी आले पाणी ? ॥१॥

राणी वदली बघत एकटक दूर दुरचा तारा
"उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गांवचा वारा "
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी ॥२॥

तिला विचारी राजा, " कां हे जीव असे जोडावे ?
कां दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे ?''
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केवलवाणी ॥३॥

कां राणीने मिटले डोळे दूर दुर जाताना ?
कां राजाचा श्वास कोंदला गीत तिचे गाताना ?
वाऱ्यावरती विरुन गेली एक उदास विराणी ॥४॥

Tuesday, April 24, 2012

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आज पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला सुमारे ११००० आंब्यांची सजावट करण्यात आली होती.त्याचा हा मनोहारी फोटो.. अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा !!!!!!!!!!!!!


Friday, March 16, 2012

प्रतीक्षा संपली, सचिनचा 'शतकोत्सव' साकारला!


मटा ऑनलाइन वृत्त । मीरपूर

...अन् आपल्या सचिननं क्रिकेटविश्वात आणखी एक इतिहास रचला. जगभरातील क्रिकेटवेडे वर्षभर ज्या क्षणाची आतूरतेनं वाट पाहत होतं, तो सचिनच्या ‘ शतकोत्सवा ’ चा क्षण आज बांगलादेशात साकारला आणि हा अनुपम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवताना सारेच कृतकृत्य होऊन केले. ‘ महाशतक ’ साकारल्यानंतर बॅट आणि हेल्मेट उंचावून आकाशाकडे पाहत सचिननं देवाचे आभार मानले, तेव्हा क्रिकेटच्या या देवाला सा-यांनीच सलाम केला.

क्रिकेटविश्वाचा अनभिषिक्त सम्राट, अनेक विक्रमांचा बादशाह असलेल्या सचिन तेंडुलकरला त्याच्या कारकीर्दीतलं शंभरावं शतक वर्षभरापासून हुलकावणी देत होतं. १२ मार्च २०११ ते १५ मार्च २०१२ या काळात इंग्लंड दौरा झाला, वेस्ट इंडिजविरुद्धची मायदेशातील कसोटी मालिका झाली, भलामोठा ऑस्ट्रेलिया दौरा झाला, पण सचिनच्या ‘ महाशतका ’ साठी काही मुहूर्त सापडत नव्हता. दोनदा तर नव्वदीच्या घरात जाऊनही सचिनच्या पदरी निराशा पडली होती. तमाम क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा सामन्यागणिक वाढत होत्या आणि लिटिल मास्टरच्या खांद्यावरचं ओझं जड-जड होत होतं. पण आज आशिया कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात, झालं गेलं सगळं विसरून, सगळी बंधनं झुगारून देत सचिन बिनधास्तपणे खेळला आणि शेरे बांगला स्टेडियमवर भारताच्या या ‘ वाघा ’ नं डरकाळी फोडली.

बांगलादेशच्या शकील अल् हसनचा चेंडू हलकेच टोलवून सचिन तेंडुलकरनं शंभरावी धाव घेतली, तेव्हा सारं स्टेडियम, पॅव्हेलियन ‘ उसळलं ’ . पण सचिनच्या चेह-यावरची धन्यता, समाधान केवळ अवर्णनीय होतं. सुरेश रैनासह बांगलादेशच्या क्रिकेटपटूंकडून शुभेच्छा स्वीकारतानाच, त्यानं आपलं हेल्मेट काढलं आणि बॅट उंचावून डोळे मिटून आकाशाकडे पाहत देवाचे आभार मानले. सचिनचा आनंद त्याच्या डोळ्यात तरळत होता आणि तो पाहून त्यांच्या चाहत्यांनाही गदगदून आलं.

कसोटी आणि वनडे किक्रेटमध्ये सर्वाधिक धावा सचिनच्या नावावर जमा आहेत. त्यात ५१ कसोटी शतकांचा समावेश असून त्याचं आजचं शतक वनडेतील ४९वं शतक ठरलं. १३८ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं सचिननं हा महापराक्रम केला. बांगलादेशविरुद्धचा सामना म्हणजे सचिनला आपलं बहुप्रतिक्षित शतक साकारण्याची नामी संधी असल्याचं क्रिकेटवर्तुळात बोललं जात होतं. त्यामुळे मास्टर ब्लास्टरवरचा दबाव अधिकच वाढला होता. परंतु, पहिल्या चेंडूपासून तो अत्यंत नेटानं, आत्मविश्वासानं, जिद्दीनं खेळला. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर, ८० ते १०० या टप्प्यात सचिननं अत्यंत सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यातच अर्धशतकवीर विराट कोहली तंबूत परतल्यानं सचिनवर दबाव आणखी वाढला होता. पण, या धक्क्यानं जराही न डगमगता तो पीचवर टिच्चून उभा राहिला आणि ‘ महाशतका ’ चं स्वप्न साकार करून त्यानं आपल्या ‘ भक्तां ’ ना प्रसन्न केलं.

आशिया कपमधील आजचा सामना अविस्मरणीय करणारा सचिन ११४ धावांवर बाद झाला. शतकानंतर त्यानं फटकेबाजी सुरू केली होती, पण मश्रफी मूर्तझानं त्याला चकवलं. सचिनचं ऐतिहासिक शतक आणि कोहली-रैनाच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं बांगालदेशपुढे २९० धावांचं आव्हान ठेवलंय.

Tuesday, March 6, 2012

होळी का साजरी करतात ?

पिंकी:- आजोबा होळी का साजरी करतात ?

आजोबा :- बेटा कारण, भक्त प्रल्हाद हा नेहमी नारायणाचे ध्यान करायचा, पण त्याचे वडील जे हिरण्यकषप्यू त्यांना हि गोष्ट बिलकुल आवडायची नाही, त्यामुळे ते प्रल्हादावर भरपूर अत्याचार करायचे व त्यास मारण्याचे भरपूर प्रयत्न करायचे, पण नारायणाच्या कृपेने भक्त प्रल्हाद नेहमी सुखरूप रहायचा, हे बघून एके दिवशी हिरण्यकषप्यूने आपली बहिण होलिका हिला, "प्रल्हादाला घेऊन आगीत उडी टाक, म्हणजे जाळून तो खाक होईल !!" असा आदेश दिला ( होलिका ला आगी मध्ये न जळण्याचा वर मिळाला होता, त्यामुळे तिला आगी पासून काहीच धोका नव्हता ) ...... नंतर होलिका ने प्रल्हादाला मांडीवर घेतले व भीषण आगीमध्ये उडी टाकली, परंतु देवाच्या भक्ताचे छळ केल्यास तुमच्या पापांची घटिका भरून येते व मिळविलेले सर्व पुण्य वाया जाते, ह्या शिकवणीची जाणीव सर्वांना सदैव रहावी म्हणून देवाने तो वर मागे घेतला व होलिका त्या आगी मध्ये जाळून खाक झाली ........... आणि नारायणाच्या कृपेने प्रल्हाद पुन्हा एकदा सुखरूप पणे आगीतून बाहेर आला.
म्हणून साधू, संताना, भक्तांना तसेच अशक्त लोकांना त्रास देऊ नये व नेहमी नारायणाचे स्मरण रहावे ह्यासाठी होळी हा सण साजरा कला जातो !!

पिंकी :- धन्यवाद आजोबा, मी नेहमी देवाचे नांव घेत जाईन.

Happy Holi :)

Tuesday, February 7, 2012

गेटवरचा तो रोजचा चेहरा ....

गेटवरचा तो रोजचा चेहरा
आज थोडा उदास दिसला
आपुलकीन बघत माझ्याकडे
थोडे हळूच उसन हसला

"निघालास ना शेवटी ....
.... खूप आठवशील रं साह्यबा
नवीन मानस .... अन तू साधा
.... स्वत:ची काळजी घे रं बाबा"
.
.
.
रोज त्याने मला चहा पाजला होता
सकाळ-संध्याकाळ सलाम ठोकला होता
मला आवडतो म्हणून डब्यात शिरा आणला होता
रात्री थांबलो होतो तेव्हा ओरडलाही होता
.
.
.
मी पाकीट काढलं, त्याने हात जोडले
मी पैसे काढले, त्याने डोळे मिटले
"बस सुखात रहा" त्याचे ओठ हलले
आशीर्वादाचे पाठीवर कापरे हात फिरले

मी पाहिलं त्या डोळ्यांत माया साठलेली
सांगताना मला ओसंडून वाहिलेली
मग दोन-चार आसवे खळकन ओघळली
सांडताना मला जाऊ नको म्हणाली
.
.
.
कोण ही माणस, कुठून आली होती
ना ठाऊक केव्हा, कधी जुळली नाती
का लावतात जीव, का वाटतात आपली
का आपल्या दु:खाची, त्यांना काळजी होती
.
.
.
चल येतो म्हणत मी त्याला ओझरता पाहिला
त्याने मग शेवटचा सलामही केला
त्याचा हात तसाच तिथेच अडकला
काळजावर माझ्या उगीच दगड ठेऊन गेला

मी हताश तसाच पायऱ्या उतरलो
चाललोय कुठे सारे विसरलो
मागे पहायचं धाडस होईना
नकळत साऱ्या आठवणीत हरवलो

.... गेटवरचा तो रोजचा चेहरा

Sunday, January 29, 2012

आज जागतिक सूर्यनमस्कार दिन...........


सूर्यनमस्कार हा भारतीय परंपरेतला एक परिपूर्ण व्यायाम आहे. शास्त्रशुध्द पध्दतीने केला तर यात व्यायामाची बहुतेक सर्व अंगे आपोआप साधतात. स्नायूंचा व्यायाम, श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम, हृदयक्रिया वाढणे, ताण-लवचीकता, पोटातील अवयवांचा व्यायाम इ. बहुतेक सर्व गरजा यात पूर्ण होतात. कमीत कमी बारा सूर्यनमस्कार घालावेत, व सोबत मन प्रसन्न-एकाग्र करण्याचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार घालण्याची पध्दत पुढे दिली आहे.

(1) सुरवातीला सावधान मुद्रेत सरळ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या समांतर रेषेत ठेवून डोक्याच्या दिशेने सरळ करावे. दोन्ही हाताचे पंजे जोडावे व त्याच अवस्थेत त्यांना खाली आणावे. म्हणजे आपण देवाला नमस्कार करतो त्या अवस्थेत उभे राहावे.

(2) जोरात श्वास घेऊन दोन्ही हात कानाला चिकटून राहतील अशा स्थितीत आणून मान व दोन्ही हात मागील बाजूने वाकवावे. असे करत असताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, कानही ताठ राहिले पाहिजेत.

(3) तिसर्‍या अवस्थेत श्वास हळू हळू सोडून पुढच्या बाजूने वाकावे. कानाला चिकटलेल्या अवस्थेत हात जमिनीला ठेकवावे. गुडघे सरळ ठेवावेत. काही क्षण अशा अवस्थेत थांबावे. या अवस्थेला 'पाद पश्चिमोत्तनासन' म्हटले जाते.

(4) त्यानंतर श्वास हळू हळू घेऊन डाव्या पायाच्या मागच्या बाजूला न्यावे. छातीला पुढच्या बाजूला जेवढे ताणता येईल तेवढे ताणावे. मान मागच्या बाजूला न्यावी. पाय ताणलेल्या अवस्थेत व शरीराच्या पुढच्या बाजूला ताणलेले अशा स्थितीत काही क्षण राहावे.

(5) श्वास हळू हळू सोडून उजवा पाय देखील डाव्या पायाप्रमाणे मागच्या बाजूला न्यावा. यावेळी दोन्ही पायाचे पंजे एकमेकाशी जोडलेले पाहिजेत. शरीर पायाच्या बाजूने ओढावे व पायाच्या टाचा जमिनीला टेकण्याचा प्रयत्न करावा. कमरेला जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करावा.

(6) श्वास घेत शरीराला जमिनीच्या समांतर ठेवून साष्टांग दंडवत घालावे व सुरवातीला गुडघे, छाती व डोके जमिनीला टेकवावे. यावेळी कंबर वरच्या बाजूला उचललेली पाहिजे. श्वास सामान्य गतीने सुरू ठेवावा.

(7) दोन्ही हातांवर जोर देऊन छातीला पुढच्या बाजूने ओढावे. मान सरळ ठेवून मागच्या बाजूने न्यावी. गुडघ्याचा जमिनीला स्पर्श करून पायाचे पंजे उभे ठेवावे. या अवस्थेला 'भुजंगासन' म्हटले जाते.

(8) ही अवस्था - पाचव्या अवस्थेसारखी आहे.

(9) ही अवस्था - चौथ्या अवस्थेसारखी आहे.

(10) ही अवस्था - तिसर्‍या अवस्थेसारखी आहे.

(11) ही अवस्था - दुसर्‍या अवस्थेसारखी आहे.

(12) ही अवस्था - पहिल्या अवस्थेसारखी राहील.

वरील बारा पायर्‍या केल्यानंतर थोडा विश्राम करण्यासाठी ताठ सरळ उभे राहावे. त्यानंतर पुन्हा हे आसन करावे. पहिली, दुसरी व तिसऱ्या अवस्थांचा क्रम आधी केल्याप्रमाणेच राहील. मात्र, चौथी अवस्थेत जेथे डावा पाय मागे केला होता तेथे आता उजवा पाय मागे करत सूर्यनमस्कार करावा.

इशारा : ज्या व्यक्तींना कंबर व पाठीच्या मणक्याचे आजार आहे त्यांनी हे आसन करून नये. त्यांनी सूर्यनमस्कार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

फायदा : सूर्यनमस्कार सर्वांसाठीच लाभदायी आहे. सूर्यनमस्कार नियमित केल्याने हातपायाचे दुखणे दूर होऊन त्यांच्यात बळकटपणा येतो. मान, छाती व हाताची दंड भरतात. शरीरावरील बिनकामाची चरबी कमी होते.

सूर्यनमस्कार केल्याने त्वचेचे आजारही कायमचे दूर होतात. नियमित केल्याने पोटाच्या समस्या नाहीशा होऊन पचन क्रिया वाढते. अतिनिद्रा, अल्सर आदी आजारही नाहीसे होतात.

Friday, January 13, 2012

चाणक्य नीती : या 5 गोष्टी कुणालाही सांगू नका

चाणक्य नीती : या 5 गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण आहे --------------

जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपणच भविष्यात अडचणीत येतो. अशा गोष्टींविषयी आचार्य चाणक्य म्हणतात-

अरथ नाश मन ताप अरु, दा चरि घर माहिं।

वंचनता अपमान निज, सुधी प्रकाशत नाहिं।।

आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य, नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे.

आचार्य चाणक्य सांगतात की, शहाणा मनुष्य सदैव आपल्या कमतरता आणि गुप्त गोष्टी गुप्तच ठेवत असतो. जे लोक अशा गोष्टी इतरांना सांगतात, ते भविष्यात कधी ना कधी अडचणीत येतात. आपण कधीही आपल्या आर्थिक स्थितीविषयी खरी माहिती इतरांना सांगू नये. आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे दु:ख होते, मनातील दु:ख किंवा संतापही गुप्त ठेवले पाहिजे. जवळपास प्रत्येक विवाहित माणसाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतातच. त्यामुळे नवरा-बायकोतील या गोष्टी चुकूनही इतरांना सांगू नये.

कधी-कधी नीच व्यक्ती किंवा संस्कारहीन व्यक्तीशी वाद-विवाद होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्या लोकांच्या शब्दांत काहीही गांभीर्य नसते. त्यामुळे त्या लोकांच्या तोंडून आलेली माहितीही कोणासमोर सांगू नये. चाणक्य म्हणतात की, तुम्हालाही अपमान सोसावे लागले असेल तरीही त्याविषयी इतरांसमोर काहीही बोलू नका.

या सा-या गोष्टी इतरांसमोर सांगितल्याने लाभ तर काहीच नाही, पण भविष्यात आपण संकटांत येऊ शकू. त्यामुळे या गोष्टी गुप्तच ठेवणे चांगले.

Tuesday, October 11, 2011

एक सकाळ....

धुक्याची चादर घेऊन पहाट यावी. कोकिळेच्या भूपाळीने जाग यावी.
ऊगवत्या नारायणाची
लाली न्याहाळावी. गोठ्यातील कपिलेची धार चाखावी.
तुक्याची एक तरी ओवी गुणगुणावी. प्रसन्न, संपन्न आयुष्याची प्रार्थना करावी.
एक सकाळ....
... अशीही अनुभवावी..

शुभ प्रभात.**

Thursday, September 15, 2011

‘फर्स्ट गिअर’.....

स्मरण फर्स्ट

त्या दिवशी गाडी चालवत होतो. मुंबईत गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जाणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली.
गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअर' टाकतो. हा 'फर्स्ट गिअर' म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई-बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे मित्र...
हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता 'पुढे' जात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कार' फर्स्ट गिअर करतो.
इथे आपल्याला unconditional प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी 'बंद पडणार नाही' याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी 'पळण्यासाठी' इतका कमी वेग पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो ! इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं.
शाळा, कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद, विविध कला..... बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं.

समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो.

गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडा लत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग, सणासुदीलानवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअर मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.आपण आता 'फोर्थ गिअर' टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं कीहॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्स, गाडी, latest मोबाईल, 1 BHK मधून 2 BHK, laptop, ह्याउ नि त्याउ..!या वेगाची नशाच काही और! गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही.... आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी.... खर्व.... निखर्व...... रुपये नाहीत, गरजा!

हा 'वेग' खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये, ' लाल' सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं....


आणि... आणि......आणि...




... ‘नियती’ नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो.

गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो. पाच.. चार.. तीन..दोन...एक....

खाट खाट गिअर मागे टाकत आपण आता neutral वर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो.

पाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखील टाकला होता याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती...आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं.गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे.. मला सांगा कुठला गिअर टाकाल?सुसाट वेगाचा पाचवा गिअर?

की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा 'फर्स्ट गिअर'?

आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ? कोणी दिला होता आधार ? आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने? EMI भरत विकत घेतलेल्या extra बेडरूमने? नव्या कोऱ्या गाडीने? 'You are promoted' असं लिहिलेल्या कागदाने?मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने!

आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा, निरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, 'होईल सगळं व्यवस्थित' म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी 'बायको'नावाची मैत्रीण, बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, 'त्या' काळात आपल्या Frustration चा‘कान’ होणारे आणि योग्य सल्ला देणारे जिवाभावाचे मित्र हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते का?

Don't Get Me Wrong.

माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही.

त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया. फक्त त्यावेळी आपल्या 'फर्स्ट गिअर्स' चं स्मरण ठेवूया.आयुष्याचा वेग मधून मधून थोssडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.सुसाट वेगाचा 'arrogance' इथे नाही... गाडी थोडी हळू चालेल हे मान्य. 'फर्स्ट गिअरचं' अस्तित्व लक्षात घ्यावंच लागेल असा हा वेग असेल.त्या निवांतपणाशी थोडं खेळूया आणि मग टाकूया पुढचा गिअर!जाता जाता आणखी एक.

स्वत:लाच एक प्रश्न विचारूया...

दुसऱ्या कुणाच्या आयुष्याचा मी बनू शकेन का ‘फर्स्ट गिअर’?

Wednesday, September 14, 2011

The nine Navratri colors for 2011

Pratipada - September 28, 2011 (Wednesday) - Blue

Dwitiya/Tritiya - September 29 (Thursday) - Yellow

Chaturthi - September 30 (Friday) - Green

Panchami - October 1 (Saturday) - Grey

Sashti - October 2 (Sunday) - Orange

Saptami - October 3 (Monday) - White

Ashtami - October 4 (Tuesday) - Red

Navami - October 5 (Wednesday) - Purple

कणा....





Monday, September 12, 2011

'तेजुकाया'वर आघात

मिरवणुकीतील अपघाताने गणेशभक्तांवर दु:खाचा डोंगर

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात मिरवणूक निघाली... 'ही शान कुणाची, तेजुकायाच्या राजाची' घोषणा आसमंतात दुमदुमली... मिरवणूक चिंचपोकळी ब्रिजजवळ आली आणि तो अपघात घडला... नियतीची काय इच्छा होती माहीत नाही, पण आमच्यावर आलेले विघ्न बाप्पाने कदाचित आपल्या अंगावर झेलेले आणि आम्हाला सुखरूप ठेवले... अत्यंत जड अंत:करणाने 'तेजुकाया मॅन्शन'चे कार्यकर्ते सांगत होते.

विसर्जनाची मिरवणूक जल्लोषात पुढे सरकत असतानाच ट्रॉलीवरून गणरायाची मूतीर् खाली कोसळली. या अपघातानंतर 'तेजुकाया मॅन्शन'च्या घराघरांतील उदास चेहरे रविवारी त्यांच्यावर कोणता जीवघेणा प्रसंग आला, हे स्पष्ट सांगत होते. गेली ४६ वर्षे तेजुकायामध्ये गणेशोत्सव साजरा होतो आहे. २००२ पासून मंडळाची मूतीर् लक्षवेधी ठरत आहे. शिस्तबद्धपणासाठी ख्याती असलेल्या या मंडळाने उत्सवाचे पावित्र्य निष्ठेने जपले आहे. यंदाची अनंत चतुदशीर् मात्र कधीही भरून येणाऱ्या जखमेसारखी आयुष्यभर टोचत राहील, असे सांगताना कार्यर्कत्यांचा बांध फुटला आणि डोळे पाणावले. गिरणगावाच्या पुनविर्कासात नव्याने उभारी घेत असलेल्या 'तेजुकाया मॅन्शन'ची चाळ पाडून पुढील वषीर् उत्सव टॉवरमध्ये साजरा होणार आहे. झालेला आघात कल्पनेपलीकडचा आहे. काय झाले ते शब्दांत सांगता येणार नाही. आमच्यावर आभाळच कोसळले. भक्तांवर आलेले विघ्न बाप्पाने कदाचित आपल्यावर झेलले आणि आम्हाला सुखरूप ठेवले, असे मंडळाचे अध्यक्ष अरूण गावकर यांनी सांगितले. या बिकट प्रसंगात लालबागचा राजा, गणेशगल्ली मंडळाच्या कार्यर्कत्यांनी 'तेजुकाया'ला धीर देत सोबत केली.

उंचीचा वाद नको
अपघातामुळे अनेक जण मूतीर्च्या उंचीचा वाद नाहक उकरून काढत आहेत. आमची मूतीर् ही फक्त १५ फुटांची होती. गणरायांच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीत सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. समुदात विसर्जन करतानाही मूतीर्च्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. ही घटना हा निव्वळ अपघात असून त्यावर अधिक चर्चा करून उत्सवाचे पावित्र्य बिघडवू नये, असे आवाहन गावकर यांनी केले.

सौजन्य:मटा ऑनलाइन

मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन अपघात, १ ठार

मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीला दोन अपघातांमुळे गालबोट लागले आहे. लालबागचा राजा भारतमाता थिएटरजवळून जात असताना एका जुन्या इमारतीची गॅलरी पडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला आणि पाचजण जखमी झाले. त्या पाठोपाठ चिंचपोकळी येथे तेजूकाया गणपती मंडळाची गणेश मूर्ती कोसळून दोनजण जखमी झाले.

सकाळी लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली. मिरवणूक भारतमाता जवळ येताच राजावर पुष्पवृष्टी केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी रस्त्यावर तसेच आसपासच्या इमारतीच्या खिडक्या आणि गॅल-यांमध्ये प्रचंड गर्दी केली. तब्बल ६०-७० वर्षे जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर, दुकानाच्या पत्र्याच्या छपरावर आणि पहिल्या मजल्याच्या गॅलरीत प्रमाणापेक्षा जास्त नागरिक दाटीवाटीने उभे होते. अतिरिक्त भार आल्यामुळे अखेर गॅलरीचा काही भाग आणि त्याला लागून असलेला दुकानाच्या छताचा पत्रा कोसळला. गॅलरीतले लोक खाली पडले. या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. एक लहान मुलगा, महिला आणि तीन पुरुष जखमी झाले. अनेकांना किरकोळ जखमा झाल्या.

पोलिसांनी जखमी झालेल्यांना केइएममध्ये दाखल केले आणि किरकोळ जखमींना घटनास्थळीच तातडीने वैद्यकीय मदत दिली.

अपघाताच्या धक्क्यातून सावरण्याआधीच भारतमाता पासून काही मिनिटांच्या अंतरावर चिंचपोकळीतील गणेश टॉकीज येथे तेजूकाया गणपती मंडळाची गणेश मूर्ती कोसळली. हा प्रकार कसा झाला ते अद्याप समजलेले नाही. मात्र मूर्ती अंगावर पडल्याने दोनजण जखमी झाल्याचे समजते.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना विसर्जन मिरवणुकीत नियमांचे पालन करण्याचे आणि स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सौजन्य:मटा ऑनलाइन

Tuesday, September 6, 2011

लालबागचा राजा वॉलपेपर

Hey Friends!! Decorate your desktop with Ganpati Bappa.. Lalbaugcha Raja 2011




1024 x 768 View सौजन्य: लालबागचा राजाची वेबसाईट



800 x 1280 View सौजन्य: लालबागचा राजाची वेबसाईट



640 x 960 View सौजन्य: लालबागचा राजाची वेबसाईट