पिंकी:- आजोबा होळी का साजरी करतात ?
आजोबा :- बेटा कारण, भक्त प्रल्हाद हा नेहमी नारायणाचे ध्यान करायचा, पण त्याचे वडील जे हिरण्यकषप्यू त्यांना हि गोष्ट बिलकुल आवडायची नाही, त्यामुळे ते प्रल्हादावर भरपूर अत्याचार करायचे व त्यास मारण्याचे भरपूर प्रयत्न करायचे, पण नारायणाच्या कृपेने भक्त प्रल्हाद नेहमी सुखरूप रहायचा, हे बघून एके दिवशी हिरण्यकषप्यूने आपली बहिण होलिका हिला, "प्रल्हादाला घेऊन आगीत उडी टाक, म्हणजे जाळून तो खाक होईल !!" असा आदेश दिला ( होलिका ला आगी मध्ये न जळण्याचा वर मिळाला होता, त्यामुळे तिला आगी पासून काहीच धोका नव्हता ) ...... नंतर होलिका ने प्रल्हादाला मांडीवर घेतले व भीषण आगीमध्ये उडी टाकली, परंतु देवाच्या भक्ताचे छळ केल्यास तुमच्या पापांची घटिका भरून येते व मिळविलेले सर्व पुण्य वाया जाते, ह्या शिकवणीची जाणीव सर्वांना सदैव रहावी म्हणून देवाने तो वर मागे घेतला व होलिका त्या आगी मध्ये जाळून खाक झाली ........... आणि नारायणाच्या कृपेने प्रल्हाद पुन्हा एकदा सुखरूप पणे आगीतून बाहेर आला.
म्हणून साधू, संताना, भक्तांना तसेच अशक्त लोकांना त्रास देऊ नये व नेहमी नारायणाचे स्मरण रहावे ह्यासाठी होळी हा सण साजरा कला जातो !!
पिंकी :- धन्यवाद आजोबा, मी नेहमी देवाचे नांव घेत जाईन.
Happy Holi :)
Tuesday, March 6, 2012
Tuesday, February 7, 2012
गेटवरचा तो रोजचा चेहरा ....
गेटवरचा तो रोजचा चेहरा
आज थोडा उदास दिसला
आपुलकीन बघत माझ्याकडे
थोडे हळूच उसन हसला
"निघालास ना शेवटी ....
.... खूप आठवशील रं साह्यबा
नवीन मानस .... अन तू साधा
.... स्वत:ची काळजी घे रं बाबा"
.
.
.
रोज त्याने मला चहा पाजला होता
सकाळ-संध्याकाळ सलाम ठोकला होता
मला आवडतो म्हणून डब्यात शिरा आणला होता
रात्री थांबलो होतो तेव्हा ओरडलाही होता
.
.
.
मी पाकीट काढलं, त्याने हात जोडले
मी पैसे काढले, त्याने डोळे मिटले
"बस सुखात रहा" त्याचे ओठ हलले
आशीर्वादाचे पाठीवर कापरे हात फिरले
मी पाहिलं त्या डोळ्यांत माया साठलेली
सांगताना मला ओसंडून वाहिलेली
मग दोन-चार आसवे खळकन ओघळली
सांडताना मला जाऊ नको म्हणाली
.
.
.
कोण ही माणस, कुठून आली होती
ना ठाऊक केव्हा, कधी जुळली नाती
का लावतात जीव, का वाटतात आपली
का आपल्या दु:खाची, त्यांना काळजी होती
.
.
.
चल येतो म्हणत मी त्याला ओझरता पाहिला
त्याने मग शेवटचा सलामही केला
त्याचा हात तसाच तिथेच अडकला
काळजावर माझ्या उगीच दगड ठेऊन गेला
मी हताश तसाच पायऱ्या उतरलो
चाललोय कुठे सारे विसरलो
मागे पहायचं धाडस होईना
नकळत साऱ्या आठवणीत हरवलो
.... गेटवरचा तो रोजचा चेहरा
आज थोडा उदास दिसला
आपुलकीन बघत माझ्याकडे
थोडे हळूच उसन हसला
"निघालास ना शेवटी ....
.... खूप आठवशील रं साह्यबा
नवीन मानस .... अन तू साधा
.... स्वत:ची काळजी घे रं बाबा"
.
.
.
रोज त्याने मला चहा पाजला होता
सकाळ-संध्याकाळ सलाम ठोकला होता
मला आवडतो म्हणून डब्यात शिरा आणला होता
रात्री थांबलो होतो तेव्हा ओरडलाही होता
.
.
.
मी पाकीट काढलं, त्याने हात जोडले
मी पैसे काढले, त्याने डोळे मिटले
"बस सुखात रहा" त्याचे ओठ हलले
आशीर्वादाचे पाठीवर कापरे हात फिरले
मी पाहिलं त्या डोळ्यांत माया साठलेली
सांगताना मला ओसंडून वाहिलेली
मग दोन-चार आसवे खळकन ओघळली
सांडताना मला जाऊ नको म्हणाली
.
.
.
कोण ही माणस, कुठून आली होती
ना ठाऊक केव्हा, कधी जुळली नाती
का लावतात जीव, का वाटतात आपली
का आपल्या दु:खाची, त्यांना काळजी होती
.
.
.
चल येतो म्हणत मी त्याला ओझरता पाहिला
त्याने मग शेवटचा सलामही केला
त्याचा हात तसाच तिथेच अडकला
काळजावर माझ्या उगीच दगड ठेऊन गेला
मी हताश तसाच पायऱ्या उतरलो
चाललोय कुठे सारे विसरलो
मागे पहायचं धाडस होईना
नकळत साऱ्या आठवणीत हरवलो
.... गेटवरचा तो रोजचा चेहरा
Sunday, January 29, 2012
आज जागतिक सूर्यनमस्कार दिन...........

सूर्यनमस्कार हा भारतीय परंपरेतला एक परिपूर्ण व्यायाम आहे. शास्त्रशुध्द पध्दतीने केला तर यात व्यायामाची बहुतेक सर्व अंगे आपोआप साधतात. स्नायूंचा व्यायाम, श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम, हृदयक्रिया वाढणे, ताण-लवचीकता, पोटातील अवयवांचा व्यायाम इ. बहुतेक सर्व गरजा यात पूर्ण होतात. कमीत कमी बारा सूर्यनमस्कार घालावेत, व सोबत मन प्रसन्न-एकाग्र करण्याचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार घालण्याची पध्दत पुढे दिली आहे.
(1) सुरवातीला सावधान मुद्रेत सरळ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या समांतर रेषेत ठेवून डोक्याच्या दिशेने सरळ करावे. दोन्ही हाताचे पंजे जोडावे व त्याच अवस्थेत त्यांना खाली आणावे. म्हणजे आपण देवाला नमस्कार करतो त्या अवस्थेत उभे राहावे.
(2) जोरात श्वास घेऊन दोन्ही हात कानाला चिकटून राहतील अशा स्थितीत आणून मान व दोन्ही हात मागील बाजूने वाकवावे. असे करत असताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, कानही ताठ राहिले पाहिजेत.
(3) तिसर्या अवस्थेत श्वास हळू हळू सोडून पुढच्या बाजूने वाकावे. कानाला चिकटलेल्या अवस्थेत हात जमिनीला ठेकवावे. गुडघे सरळ ठेवावेत. काही क्षण अशा अवस्थेत थांबावे. या अवस्थेला 'पाद पश्चिमोत्तनासन' म्हटले जाते.
(4) त्यानंतर श्वास हळू हळू घेऊन डाव्या पायाच्या मागच्या बाजूला न्यावे. छातीला पुढच्या बाजूला जेवढे ताणता येईल तेवढे ताणावे. मान मागच्या बाजूला न्यावी. पाय ताणलेल्या अवस्थेत व शरीराच्या पुढच्या बाजूला ताणलेले अशा स्थितीत काही क्षण राहावे.
(5) श्वास हळू हळू सोडून उजवा पाय देखील डाव्या पायाप्रमाणे मागच्या बाजूला न्यावा. यावेळी दोन्ही पायाचे पंजे एकमेकाशी जोडलेले पाहिजेत. शरीर पायाच्या बाजूने ओढावे व पायाच्या टाचा जमिनीला टेकण्याचा प्रयत्न करावा. कमरेला जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करावा.
(6) श्वास घेत शरीराला जमिनीच्या समांतर ठेवून साष्टांग दंडवत घालावे व सुरवातीला गुडघे, छाती व डोके जमिनीला टेकवावे. यावेळी कंबर वरच्या बाजूला उचललेली पाहिजे. श्वास सामान्य गतीने सुरू ठेवावा.
(7) दोन्ही हातांवर जोर देऊन छातीला पुढच्या बाजूने ओढावे. मान सरळ ठेवून मागच्या बाजूने न्यावी. गुडघ्याचा जमिनीला स्पर्श करून पायाचे पंजे उभे ठेवावे. या अवस्थेला 'भुजंगासन' म्हटले जाते.
(8) ही अवस्था - पाचव्या अवस्थेसारखी आहे.
(9) ही अवस्था - चौथ्या अवस्थेसारखी आहे.
(10) ही अवस्था - तिसर्या अवस्थेसारखी आहे.
(11) ही अवस्था - दुसर्या अवस्थेसारखी आहे.
(12) ही अवस्था - पहिल्या अवस्थेसारखी राहील.
वरील बारा पायर्या केल्यानंतर थोडा विश्राम करण्यासाठी ताठ सरळ उभे राहावे. त्यानंतर पुन्हा हे आसन करावे. पहिली, दुसरी व तिसऱ्या अवस्थांचा क्रम आधी केल्याप्रमाणेच राहील. मात्र, चौथी अवस्थेत जेथे डावा पाय मागे केला होता तेथे आता उजवा पाय मागे करत सूर्यनमस्कार करावा.
इशारा : ज्या व्यक्तींना कंबर व पाठीच्या मणक्याचे आजार आहे त्यांनी हे आसन करून नये. त्यांनी सूर्यनमस्कार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
फायदा : सूर्यनमस्कार सर्वांसाठीच लाभदायी आहे. सूर्यनमस्कार नियमित केल्याने हातपायाचे दुखणे दूर होऊन त्यांच्यात बळकटपणा येतो. मान, छाती व हाताची दंड भरतात. शरीरावरील बिनकामाची चरबी कमी होते.
सूर्यनमस्कार केल्याने त्वचेचे आजारही कायमचे दूर होतात. नियमित केल्याने पोटाच्या समस्या नाहीशा होऊन पचन क्रिया वाढते. अतिनिद्रा, अल्सर आदी आजारही नाहीसे होतात.
Friday, January 13, 2012
चाणक्य नीती : या 5 गोष्टी कुणालाही सांगू नका
चाणक्य नीती : या 5 गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण आहे --------------
जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपणच भविष्यात अडचणीत येतो. अशा गोष्टींविषयी आचार्य चाणक्य म्हणतात-
अरथ नाश मन ताप अरु, दा चरि घर माहिं।
वंचनता अपमान निज, सुधी प्रकाशत नाहिं।।
आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य, नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे.
आचार्य चाणक्य सांगतात की, शहाणा मनुष्य सदैव आपल्या कमतरता आणि गुप्त गोष्टी गुप्तच ठेवत असतो. जे लोक अशा गोष्टी इतरांना सांगतात, ते भविष्यात कधी ना कधी अडचणीत येतात. आपण कधीही आपल्या आर्थिक स्थितीविषयी खरी माहिती इतरांना सांगू नये. आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे दु:ख होते, मनातील दु:ख किंवा संतापही गुप्त ठेवले पाहिजे. जवळपास प्रत्येक विवाहित माणसाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतातच. त्यामुळे नवरा-बायकोतील या गोष्टी चुकूनही इतरांना सांगू नये.
कधी-कधी नीच व्यक्ती किंवा संस्कारहीन व्यक्तीशी वाद-विवाद होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्या लोकांच्या शब्दांत काहीही गांभीर्य नसते. त्यामुळे त्या लोकांच्या तोंडून आलेली माहितीही कोणासमोर सांगू नये. चाणक्य म्हणतात की, तुम्हालाही अपमान सोसावे लागले असेल तरीही त्याविषयी इतरांसमोर काहीही बोलू नका.
या सा-या गोष्टी इतरांसमोर सांगितल्याने लाभ तर काहीच नाही, पण भविष्यात आपण संकटांत येऊ शकू. त्यामुळे या गोष्टी गुप्तच ठेवणे चांगले.
जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपणच भविष्यात अडचणीत येतो. अशा गोष्टींविषयी आचार्य चाणक्य म्हणतात-
अरथ नाश मन ताप अरु, दा चरि घर माहिं।
वंचनता अपमान निज, सुधी प्रकाशत नाहिं।।
आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य, नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे.
आचार्य चाणक्य सांगतात की, शहाणा मनुष्य सदैव आपल्या कमतरता आणि गुप्त गोष्टी गुप्तच ठेवत असतो. जे लोक अशा गोष्टी इतरांना सांगतात, ते भविष्यात कधी ना कधी अडचणीत येतात. आपण कधीही आपल्या आर्थिक स्थितीविषयी खरी माहिती इतरांना सांगू नये. आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे दु:ख होते, मनातील दु:ख किंवा संतापही गुप्त ठेवले पाहिजे. जवळपास प्रत्येक विवाहित माणसाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतातच. त्यामुळे नवरा-बायकोतील या गोष्टी चुकूनही इतरांना सांगू नये.
कधी-कधी नीच व्यक्ती किंवा संस्कारहीन व्यक्तीशी वाद-विवाद होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्या लोकांच्या शब्दांत काहीही गांभीर्य नसते. त्यामुळे त्या लोकांच्या तोंडून आलेली माहितीही कोणासमोर सांगू नये. चाणक्य म्हणतात की, तुम्हालाही अपमान सोसावे लागले असेल तरीही त्याविषयी इतरांसमोर काहीही बोलू नका.
या सा-या गोष्टी इतरांसमोर सांगितल्याने लाभ तर काहीच नाही, पण भविष्यात आपण संकटांत येऊ शकू. त्यामुळे या गोष्टी गुप्तच ठेवणे चांगले.
Tuesday, October 11, 2011
एक सकाळ....
धुक्याची चादर घेऊन पहाट यावी. कोकिळेच्या भूपाळीने जाग यावी.
ऊगवत्या नारायणाची
लाली न्याहाळावी. गोठ्यातील कपिलेची धार चाखावी.
तुक्याची एक तरी ओवी गुणगुणावी. प्रसन्न, संपन्न आयुष्याची प्रार्थना करावी.
एक सकाळ....
... अशीही अनुभवावी..
शुभ प्रभात.**
ऊगवत्या नारायणाची
लाली न्याहाळावी. गोठ्यातील कपिलेची धार चाखावी.
तुक्याची एक तरी ओवी गुणगुणावी. प्रसन्न, संपन्न आयुष्याची प्रार्थना करावी.
एक सकाळ....
... अशीही अनुभवावी..
शुभ प्रभात.**
Thursday, September 15, 2011
‘फर्स्ट गिअर’.....
स्मरण फर्स्ट
त्या दिवशी गाडी चालवत होतो. मुंबईत गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जाणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली.
गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअर' टाकतो. हा 'फर्स्ट गिअर' म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई-बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे मित्र...
हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता 'पुढे' जात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कार' फर्स्ट गिअर करतो.
इथे आपल्याला unconditional प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी 'बंद पडणार नाही' याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी 'पळण्यासाठी' इतका कमी वेग पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो ! इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं.
शाळा, कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद, विविध कला..... बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं.
समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो.
गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडा लत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग, सणासुदीलानवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअर मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.आपण आता 'फोर्थ गिअर' टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं कीहॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्स, गाडी, latest मोबाईल, 1 BHK मधून 2 BHK, laptop, ह्याउ नि त्याउ..!या वेगाची नशाच काही और! गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही.... आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी.... खर्व.... निखर्व...... रुपये नाहीत, गरजा!
हा 'वेग' खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये, ' लाल' सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं....
आणि... आणि......आणि...
... ‘नियती’ नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो.
गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो. पाच.. चार.. तीन..दोन...एक....
खाट खाट गिअर मागे टाकत आपण आता neutral वर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो.
पाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखील टाकला होता याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती...आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं.गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे.. मला सांगा कुठला गिअर टाकाल?सुसाट वेगाचा पाचवा गिअर?
की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा 'फर्स्ट गिअर'?
आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ? कोणी दिला होता आधार ? आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने? EMI भरत विकत घेतलेल्या extra बेडरूमने? नव्या कोऱ्या गाडीने? 'You are promoted' असं लिहिलेल्या कागदाने?मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने!
आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा, निरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, 'होईल सगळं व्यवस्थित' म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी 'बायको'नावाची मैत्रीण, बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, 'त्या' काळात आपल्या Frustration चा‘कान’ होणारे आणि योग्य सल्ला देणारे जिवाभावाचे मित्र हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते का?
Don't Get Me Wrong.
माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही.
त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया. फक्त त्यावेळी आपल्या 'फर्स्ट गिअर्स' चं स्मरण ठेवूया.आयुष्याचा वेग मधून मधून थोssडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.सुसाट वेगाचा 'arrogance' इथे नाही... गाडी थोडी हळू चालेल हे मान्य. 'फर्स्ट गिअरचं' अस्तित्व लक्षात घ्यावंच लागेल असा हा वेग असेल.त्या निवांतपणाशी थोडं खेळूया आणि मग टाकूया पुढचा गिअर!जाता जाता आणखी एक.
स्वत:लाच एक प्रश्न विचारूया...
दुसऱ्या कुणाच्या आयुष्याचा मी बनू शकेन का ‘फर्स्ट गिअर’?
त्या दिवशी गाडी चालवत होतो. मुंबईत गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जाणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली.
गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअर' टाकतो. हा 'फर्स्ट गिअर' म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई-बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे मित्र...
हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता 'पुढे' जात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कार' फर्स्ट गिअर करतो.
इथे आपल्याला unconditional प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी 'बंद पडणार नाही' याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी 'पळण्यासाठी' इतका कमी वेग पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो ! इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं.
शाळा, कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद, विविध कला..... बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं.
समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो.
गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडा लत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग, सणासुदीलानवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअर मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.आपण आता 'फोर्थ गिअर' टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं कीहॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्स, गाडी, latest मोबाईल, 1 BHK मधून 2 BHK, laptop, ह्याउ नि त्याउ..!या वेगाची नशाच काही और! गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही.... आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी.... खर्व.... निखर्व...... रुपये नाहीत, गरजा!
हा 'वेग' खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये, ' लाल' सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं....
आणि... आणि......आणि...
... ‘नियती’ नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो.
गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो. पाच.. चार.. तीन..दोन...एक....
खाट खाट गिअर मागे टाकत आपण आता neutral वर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो.
पाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखील टाकला होता याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती...आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं.गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे.. मला सांगा कुठला गिअर टाकाल?सुसाट वेगाचा पाचवा गिअर?
की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा 'फर्स्ट गिअर'?
आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ? कोणी दिला होता आधार ? आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने? EMI भरत विकत घेतलेल्या extra बेडरूमने? नव्या कोऱ्या गाडीने? 'You are promoted' असं लिहिलेल्या कागदाने?मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने!
आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा, निरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, 'होईल सगळं व्यवस्थित' म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी 'बायको'नावाची मैत्रीण, बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, 'त्या' काळात आपल्या Frustration चा‘कान’ होणारे आणि योग्य सल्ला देणारे जिवाभावाचे मित्र हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते का?
Don't Get Me Wrong.
माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही.
त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया. फक्त त्यावेळी आपल्या 'फर्स्ट गिअर्स' चं स्मरण ठेवूया.आयुष्याचा वेग मधून मधून थोssडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.सुसाट वेगाचा 'arrogance' इथे नाही... गाडी थोडी हळू चालेल हे मान्य. 'फर्स्ट गिअरचं' अस्तित्व लक्षात घ्यावंच लागेल असा हा वेग असेल.त्या निवांतपणाशी थोडं खेळूया आणि मग टाकूया पुढचा गिअर!जाता जाता आणखी एक.
स्वत:लाच एक प्रश्न विचारूया...
दुसऱ्या कुणाच्या आयुष्याचा मी बनू शकेन का ‘फर्स्ट गिअर’?
Wednesday, September 14, 2011
The nine Navratri colors for 2011
Pratipada - September 28, 2011 (Wednesday) - Blue
Dwitiya/Tritiya - September 29 (Thursday) - Yellow
Chaturthi - September 30 (Friday) - Green
Panchami - October 1 (Saturday) - Grey
Sashti - October 2 (Sunday) - Orange
Saptami - October 3 (Monday) - White
Ashtami - October 4 (Tuesday) - Red
Navami - October 5 (Wednesday) - Purple
Subscribe to:
Posts (Atom)